🌻🌹🌷🌻🌹🌷🌻🌹🌷🌻🌹
*स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. संयम आणि माफ करण्याची ताकत मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते...!!!*
*अहंकार कोणालाच चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात. एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं, तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं. आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो...!!!*
*पाप वाईट असते यात शंकाच नाही. पण पुण्य केल्याचा गर्व, त्याहीपेक्षा वाईट असतो. जीवन जगण्याची कला, त्यांनाच माहित असते...!!!*
*जे स्वतःसोबत दुस-याच्याही, आनंदाचा विचार करतात. मन शांत ठेवायला, आणि उत्तराची प्रतिक्षा करायला शिकलात, तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं, तुमचं मन तुम्हाला देतं. झेप अशी घ्यायची की, आपल्याला नावं ठेवणाऱ्यांची, झोप उडाली पाहीजे...!!!*
*रस्ता चुकणं चुकिचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजुन पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकिचं आहे. विश्वास ठेवा की, श्रम, संयम, आणि नियम कधीच धोका देत नसतात...!!!*
*वाढत्या वया पेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे...!!!*
*सुख मिळालं, तर उपभोगायचं, मिरवायचं नाही.. आणि दु:ख मिळालं, तर पचवायचं, गिरवायचं नाही...!!!*
*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो...!!!*
*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Post a Comment